रक्षाबंधन
रक्षाबंधन डॉ. अलोक पवार लहानपणी राखी बांधून घ्यायची म्हणजे अगदी उत्साह असायचा अजूनही हा उत्साह आहेच. म्हणजे माझ्या आवडीची राखीच पाहिजे. त्यावर अमुक तमुक कार्टून पाहिजे, गाडीची राखी पाहिजे, शक्तिमान ची, सुपर हिरोची राखी पाहिजे. म्हणजे त्या काळी रक्षाबंधन या दिवसाचे महत्व काय माहिती. मला पाहिजे, माझ्यासाठी पाहिजे शक्यतो हिच भावना सर्व लहान भावंडात असतेच. आणि मुलांमध्ये बर भावना, मुली ही भावना जोपासू शकत नाहीच. कारण हे रक्षा सूत फक्त आणि फक्त भावाच्या मनगटावर बांधले जाते. असो आजच्या लेखात मी धार्मिक, ऐतिहासिक आणि अलोक - स्टाईल सर्व माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. जर धार्मिक गोष्टी बघायला गेलो तर इंद्राच्या बायकोला 'शूचीला' विष्णुकडून एक धागा मिळालेला. हा विष्णू म्हणजे तोच जो कधी कठोर रामाचा अवतार घेतो कधी प्रेमळ कृष्णाचा अवतार घेतो, कधी तोच कृष्ण विठेवरचा विठ्ठल बनतो. वृत्रासूर नावाच्या दैत्यासोबत युद्ध होते. त्यावेळी शुची ने तो धागा इंद्राच्या मनगटावर बांधला. आणि इंद्र ते युद्ध जिंकला. ही सत्य घटना असेल किंवा आख्यायिका असेल. काही गोष्टी समजावून घेणे अत्यंत आवश्यक आहेत. इंद्र ह...