Posts

Showing posts from October, 2021

स्कंदमाता : आई जननी

Image
  स्कंदमाता : आई जननी अलोक पवार एकदंरीतच आईला जगामध्ये प्रत्येक ठिकाणी सर्वक्षेष्ठ मानले गेले आहे. प्रत्येक स्त्रीला मूल झाले की तिला सर्वस्व येते असे म्हणतात. देवी पार्वती जरी जगाची माता झाली ना तरी तिला मुलांची आवड ही तिच्या संपूर्ण जीवनावरून दिसून येतात. जेंव्हा महादेवाने जगाची काळजी घेण्यासाठी आपल्या पुत्राला जवाबदारी दिली तेंव्हा पार्वतीने तिच्याकडेच तिच्यासाठी म्हणूनच एका पुत्राची निर्मिती केली. त्याच गणेशाला आराध्य बनविण्यासाठी पार्वतीने केलेला आटापिटा पण सर्वांना माहिती आहे. पण ही स्कंदमातेची कहाणी गणेशाच्या जन्माच्या आधीची. स्कंद कुमार म्हणजेच कार्तिकेय. सहा मुखी कार्तिकेय हा माता पार्वती आणि भगवान महादेव यांचे पुत्र. स्कंद कुमार यांनी देवीला आई बनण्याचे सुख प्रदान केले आणि म्हणूनच पार्वती झाली स्कंदमाता. आई नक्की काय असते, आपल्या लेकरासाठी ती किती झटते, त्याला वाढविण्यासाठी ती किती कष्ट घेते याचे ही आदिमाता स्कंदमाता जगासमोर आई म्हणून मांडणी करणारी पहिली स्त्री. एकंदरीतच मातृत्व असणाऱ्या महिलांचे प्रतिनिधित्व करणारी ओळख म्हणजे स्कंदमाता. मातृत्वामध्ये एक आपल्यासारखा नाकी ...

देवी कुष्मांडा : नवनिर्माती

Image
देवी कुष्मांडा : नवनिर्माती अलोक पवार कुष्मांडा देवी नवनिर्माण करणारे द्योतक आहे. तिला आदिशक्ती देखील म्हणले जाते. असे म्हणतात की ब्रम्हदेवाने पृथ्वीची रचना केली. मात्र साक्षात त्याची रचना कोठून केली हे गुलदस्त्यात आहे. कुष्मांडा देवी ही सुर्यमंडळात राहते. तिनेच संपूर्ण सृष्टी निर्माण केली, सुरवातीलाच तिने आपल्या तीन डोळ्यांच्या साहायाने महाशक्ती, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिघींची निर्मिती केली व त्यांच्यासाहाय्याने पुढे ब्रम्हा विष्णू महेश यांची देखील निर्मिती झाली. एकूणच सुष्टी आणि जीव निर्माण केल्यामुळे या देवीला आदिशक्ती देखील म्हणले जाते. एकदा निर्माण झाले तर काम अजिबात संपत नसते. या पृथ्वीवर कोणतीच गोष्ट शाश्वत अशी राहत नाही. प्रत्येक वेळी नवनवीन गोष्टींचा ध्यास हा महत्वाचा असतो. भारतातल्या बऱ्याच स्त्रिया अगदी परग्रहांच्या शोधमोहिमेत देखील दिसतात. मोठेमोठे शोध देखील स्त्रिया लावत आहेत. अंतराळवीर कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स यांची प्रतिभा तर डोळ्यासमोर आहेच. महिलांनी नवनिर्मिती कशी होते, त्यामध्ये कशी प्रगती झाली आहे, कशी पाहिजे आहे या गोष्टींमध्ये लक्ष घातल्यास कित्येक पट...

चंद्रघंटा : महिषासुरमर्दिनी

Image
  चंद्रघंटा : महिषासुरमर्दिनी पवार अलोक अर्जुन अलका परिस्थिती नेहमीच सारखी असते असे नसते. कुठे तरी सर्व व्यवस्थित चालु असले तर विचित्र अशी परिस्थिती नेहमी होत असते. देवांची परिस्थिती देखील अशीच होती. महिषासुर नावाच्या राक्षसाने हाहाकार माजवला होता. भूलोकसोबत स्वर्गावर देखील त्याला त्याचे अधिपत्य पाहिजे होते. यासाठी तो इंद्र देवावर देखील चाल करून गेला. युद्धात हरल्यावर इंद्र आणि संपूर्ण देवगण मदतीसाठी त्रिदेवांकडे धावून गेले. महिषासुराला मिळालेल्या वरामुळे तो अतिशय शक्तिशाली होता. त्याला चितपट करण्यासाठी एका स्त्री शक्तीची गरज होती. त्यामुळे देवी पार्वतीने संपूर्ण तयारी केली.ब्रम्हा, विष्णू आणि महेशाची क्रोधाग्नी पार्वतीला मिळालाच होता. त्यासोबतच महादेवाने तिला स्वतःचे त्रिशूल दिले, विष्णूने स्वतःचे सुदर्शन चक्र दिले. सूर्याने स्वतःकडून तेज आणि तलवार दिली. इंद्राने स्वतःच्या राज्याची काळजी घेण्यासाठी देवीला स्वतःकडून वज्रास्त्र आणि एक घंटा दिली. चंद्र स्वतःच देवीच्या मस्तकावर आरूढ झाली. देवीच्या या स्वरूपावरून तिचे नाव चंद्रघंटा पडले. दशभुजधारी चंद्रघंटा महिषासुरावर आगेकूच करून गेली...

ब्रह्मचारिणी : एका साधनेची कथा

Image
ब्रह्मचारिणी  : एका साधनेची कथा पवार अलोक अर्जुन अलका सतीने हिमालयाकडे पुनर्जन्म घेतला होता. मात्र फक्त नवीन शरीर हा तिचा उद्देश नव्हता. तिला या जन्मातही भगवान शंकर यांना प्राप्त करायचे होते. यासाठी शैलपुत्री देवीने एक मोठी साधना करण्याचा निर्णय घेतला. ती ब्रम्हचारिणी झाली.ब्रम्ह म्हणजेच ही साधना, आणि चारिणी म्हणजे आचरणात आणणारी. तिने पुढे बरीच वर्षे साधना केली. या संपूर्ण कालावधीत फक्त आणि फक्त फळांचे ग्रहण करून ती राहिली. तिची इतकी महत्वाकांक्षी साधना बघून सर्व देवांनी तिला वरदान दिले. तिला महादेवाची प्राप्ती हा तिच्या साधनेचा शेवटचा भाग होता. आजकाल बऱ्याच महिला अवतीभोवती साधना करताना दिसतात. ही साधना कधीतरी शिक्षणाच्यासाठी असते, तर कधी स्वकर्तृत्व सिद्ध करण्यासाठी साधना सुरूच असते. या साधनेत बऱ्याच बाह्य अडचणी दिसून येतात. शिक्षण घेतल्याने प्रत्येकाच्या ज्ञानात भर पडत असते. मात्र पितृसत्ताक समाजात बहुतांशी मुलींना शिक्षणापासून दूर ठेवले जाते. शासकीय नियमानुसार ती जोपर्यंत १८ वर्षाची होत नाही तो पर्यंत तिला शिकवले जाते. साधारण बारावीपर्यंत किंवा पदवीच्या प्रथम वर्षापर्यंत ती शिकत...

हिमालय कन्या : शैलपुत्री

Image
  हिमालय कन्या : शैलपुत्री पवार अलोक अर्जुन अलका सती, भगवान शंकराची अर्धांगिनी. सतीने महादेवावर यथेच्छ प्रेम केले, हे प्रेम करताना तिने तो व्यक्ती कसा आहे, तो कसा राहतो, कोणासोबत राहतो या सगळ्या गोष्टी अजिबात लक्षात घेतल्या नव्हत्या. मात्र तिच्या वडिलांना प्रजापती दक्षाला शंकर अजिबातच मान्य नव्हता. आपली राजकन्या कुठे श्रीमंतीच्या थाटात वाढलेली, आणि कुठे हा विरक्ती पुरुष जो स्मशानात राहतो. गरीब-श्रीमंती सोबत येथे उच्च आणि कनिष्ठ या सर्वच गोष्टी पुढे आल्या होत्या. मात्र लग्न करेल तर महादेवासोबतच म्हणून तप करून घरातून निघून जाऊन सतीने शंकराची प्राप्ती केलीच. पुढे दक्षाने एक यज्ञाचे आयोजन केले. तिन्ही लोकांतून बऱ्याच मंडळींना आमंत्रण होते फक्त महादेवाच्या परिवाराला आमंत्रण दिले गेले नाही. सतीला ही गोष्ट समजल्यावर तिने महादेवांसोबत तिथे यज्ञाला येण्याबाबत बोलले. मात्र आमंत्रण नाही तर तिथे कसे जावे हा प्रश्न महादेवाने समोर केला. एकाच घरातले असल्यामुळे आपल्याला आमंत्रण नसावे असे ती म्हणाली मात्र महादेव आपल्या विचारांवर ठाम होते. त्यांनी सतीला जाण्यास अडवले नाही, मात्र स्वतः तिकडे गेले नाह...