Posts

Showing posts from October, 2022

भावा बहिणीच्या नात्याचा सण : भाऊबीज

Image
  भावा बहिणीच्या नात्याचा सण : भाऊबीज डॉ. अलोक पवार पहिले इतिहासात जाऊ मग भाऊबीज सणाचा अर्थ लावू. इतिहास म्हणजे या भाऊबीजेची आख्यायिका कधीपासून. तर या दिवशी यमराज याला आपल्या बहिणीच्या यमीच्या म्हणजेच यमुना नदीच्या घरून जेवायचे आमंत्रण येते. बहिणीने जेवायला बोलावले तर जावेच लागेल म्हणून यम आपली सर्व कामे सोडून यमुनेकडे जेवायला जातो. यमुनेने त्याला अगदी रेलचेल म्हणजे मिष्ठानांचे भोजन करतो. जेवण करताना तो फक्त आपल्या बहिणीचा विचार करतो. तिचे भले कसे होईल तिची भरभराट कशी होईल हे सर्व विचार त्याच्या डोक्यात असतात. त्याच्या रोजच्या कामांचा म्हणजे आपल्याला नरकातल्या लोकांचे प्राण हरायचे असतात हे तो स्पष्ट विसरतो. यमुना त्याला औक्षण करते. यम तिला आशीर्वाद देतो. यम आणि म्हणजेच याचं प्रेमाखातर भाऊबीजेला यमद्वितीया असे देखील म्हणतात.  हा झाला गोष्टीचा किंवा अख्यायिकेचा भाग. आजच्या दिवशी नदीत स्नान करावे असे देखील म्हणतात. यमुना नदी पावते, आपल्या भावाला नदीत स्नान करणाऱ्याचे रक्षण कर असे म्हणते. असो, गोष्टीवरून लक्षात येते की भाऊ कितीही कामात असला तरी आजचा दिवस खास बहिणीसाठी काढून बहिणीन...

कोजागिरी पौर्णिमा

Image
 कोजागिरी पौर्णिमा डॉ. अलोक पवार भारतातील बहुतांशी सण हे कृषीप्रधान किंवा निसर्गाशी एकरूप असे दिसून येतात. कोजागिरी पौर्णिमा हा देखील त्यांपैकी एक. शेतकरी मोठ्या भक्ती भावाने शेत कसतो, नांगरतो, त्यात बियाणे पेरतो, मशागत करतो आणि धान्य तयार करतो. याच शेतकऱ्याला हे धान्य विक्री करून पैसा कमवायचा असतो. यासाठी त्याला योग्य ज्ञानाची कास धरायची असते. त्याच्या ज्ञानात भर टाकण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेला साक्षात लक्ष्मी पृथ्वीवर फिरत असते. संध्याकाळी चंद्रप्रकाशात लक्ष्मी साक्षात इथे फिरते आणि साक्षात तिच पाहते की कोजागर... म्हणजेच कोण जागे आहे. हे कोण जागे आहे म्हणजे कोण ज्ञान प्राप्ती साठी इच्छुक आहे. शेतकऱ्याला उपदेशून पौर्णिमा असल्याने लक्ष्मी सोबत बळीराजाची देखील पूजा केली जाते. यादिवशी पृथ्वीभोंवती फिरणारा चंद्र पृथ्वीच्या भरपूर जवळ आलेला असतो, त्यामुळे चंद्र मोठा, सफेद आणि भरपूर तेजस्वी असा दिसतो. कोकणामध्ये याच पौर्णिमेला नवान्न पौर्णिमा असे देखील म्हणतात. बाजारामध्ये बऱ्याच गोष्टींची रेलचेल असते. त्यामध्येही भाताच्या लोंब्या, कुर्डूची फुले, नाचणी, वराई विविध फुले त्यातही झेंडू अशा ...

सिद्धीदात्री : सिद्धीला आवाहन

Image
सिद्धीदात्री : सिद्धीला आवाहन  डॉ. अलोक पवार  भगवान महादेव कठोर तपस्या करून शेवटी सिद्धीदात्री देवी प्रसन्न होऊन त्यांना एकूण आठ सिद्धी म्हणजेच आणिमा, गरिमा, महिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व अशा सिधी प्रदान करते. याच सोबत देवीचे अर्धे शरीर हे देवी पार्वती चे शरीर म्हणजे अर्धनारीनटेश्वर असे झाले होते. देवीचे हे रूप तेजस्वी शक्तिशाली असे होते. तिला एकंदरीतच सर्व देवांचे तेज, शक्ती प्राप्त झाल्या होत्या. म्हणून ती दुर्गेच असीम रूप म्हणायला काही हरकत नाही.     सिद्धीदात्री देवीचा विचार केला तर कोणत्याही व्यक्तीने मनापासून काही गोष्टींना साध्य करण्याचा प्रयत्न केला तर ते साध्य होते. बऱ्याच स्त्रिया आज राजकारणात, वैद्यकीय क्षेत्रात, अभियांत्रिकी क्षेत्रात, उच्च पदांवर कार्यरत आहेत. ग्रामीण भागात शेती देखील स्त्रिया अगदी मनोभावे करतात आणि शेतातून पिक काढतात. बाजारात जे उत्पादन तयार झालेले आहे ते ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे काम देखील स्त्रिया करतात. म्हणजेच आपण आधुनिक भाषेत बोलायचे झाले तर संपूर्ण सप्लाय मॅनेजमेंट सिस्टीम मध्ये या स्त्रिया आपली आगेकूच कर...

महागौरी : एका तपस्येची गोष्ट

Image
  महागौरी : एका तपस्येची गोष्ट डॉ. अलोक पवार देवी पार्वती जेंव्हा मोठी झाली तेंव्हा आपल्यासाठी वर म्हणून फक्त आणि फक्त महादेव असावेत हे त्यांनी मनाशी निश्चित केले होते. पण ते पाहिजे तितके सोप्पे नव्हते. म्हणून त्यांनी घनदाट जंगलात तपस्या केली. ही तपस्या एक दिवसाची नव्हती. भरपूर ऊन, पाऊस, थंडी भरपूर गोष्टींचा त्रास सहन करून पार्वती तपस्ये मध्ये अगदी ध्यानमय झाली होती. तिला तिच्या शरीराची काळजी नव्हतीच मुळी. तिला फक्त तिचा संकल्प जो होता, त्याची प्राप्ती करून घ्यावयाची होती. पार्वती बरीच दुबली आणि काळी देखील झाली होती. तिच्या शरीरा वरिल सर्वच तेज नाहीसे झाले होते. तिची एवढी कठोर आराधना पाहून भगवान महादेव प्रसन्न होतात आणि तिला वर मागण्यासाठी सांगतात. मला आपली पत्नी म्हणून स्वीकार करा असे आवाहन ती करते, जे आवाहन महादेवांकडून स्वीकार होते. त्या वेळी तपस्या करून पार्वती ची जी अवस्था असते म्हणजे ती काळी - दुबळी झाली असते त्याला पूर्ववत करणे देखील गरजेचे असते. भगवान महादेवाने यासाठी आपल्या कमंडळू मधील गंगाजलाच्या मदतीने पार्वतीला पुन्हा तेजस्वी करतात. ती इतकी श्वेतवर्णीय होते की तिचे नाव ...

काळरात्री देवी : असुरांचा काळ

Image
  काळरात्री देवी असुरांचा काळ डॉ. अलोक पवार देवांच्या कृपेने बरेच राक्षस पृथ्वीवर आपली प्रबळ शक्ती वापरून बरीच नासधूस करायचे. साधूसंत, लोकांना मारायचे. मी देवांच्या कृपेनें या करिता बोललो कारण हे राक्षस तपश्चर्या करायचे आणि देवांना वरदान मागायचे मग काय त्यांना तो देव पण त्यांना काही करू शकणार नाही असे प्रबळ वरदान त्यांच्या कडे असायचे. असाच एक दानव आधीच्या काळी होता तो म्हणजे रक्तबीज. रक्तबीजला वरदान होते की त्याच्या रक्ताचा अंश जमिनीवर पडला तर त्याच्यासारखा अजून एक दानव उत्पन्न होत होता. अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही देवाला त्याच्याशी युद्ध करणे अशक्य होते. हे युद्ध कोणत्याही अस्त्राने देखील शक्य नव्हते. रक्तबीजाचे रक्त सांडून बरेच दानव उत्पन्न झाले होते. सगळे देव निराश होऊन भगवान शिवाकडे गेले. माता पार्वती तिथेच होती. तीने स्वतःपासून काळरात्री निर्माण केली. काळरात्री देव काळी या एकच देव्या. त्या कालीचे रूप हे दैत्यांसाठी कर्दनकाळचं होते. ती रक्तबीजाची मुंडी छाटून लगेचच ते रक्त प्राशन करायची. त्यामुळे नवीन असूर उत्पत्ती व्हायचीच नाही. रक्तबीजाचे रक्त पिऊन मातेच स्वरूप उग्र झाले होते...