Posts

Showing posts from November, 2021

काळभैरव जयंतीनिमित्त

Image
 काळभैरव जयंतीनिमित्त अलोक पवार साधारण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये काळभैरवाचे मंदिर असते. अगदी घरात म्हणले तरी हा काळभैरव प्रत्येक हिंदू माणसांच्या घरात देखील कुलदैवत म्हणून विराजमान दिसतो. कालभैरव बऱ्याचदा मंदिरांमध्ये रूढी परंपरा यांच्या मध्ये घट्ट होताना दिसतो. काही दिवसांपूर्वी स्त्रिया आणि मंदिरप्रवेश या विषयावर महाराष्ट्रात आणि केरळमध्ये पण बराच तांडव झाला, वाद झाला. या लढाई मध्ये कोण हरल कोण जिंकलं हे पाहण्यापेक्षा आपण सत्य शोधलं पाहिजे आणि त्याला अनुसरून आपले आचरण केले पाहिजे. सर्वात पहिले आपण या देवाच्या उत्पत्तीच्या काही गोष्टीं समजून घेऊ. एकदा ब्रम्हा विष्णू आणि महेश म्हणजेच भोलानाथ शंकर यांच्यामध्ये वाद झाला, विषय होता तिघांमध्ये नक्की श्रेष्ठ कोण? देवांमध्ये असा वाद होणे म्हणजे थोडे आश्चर्यच नाही. तिघांचे स्थान तसे आपल्या जागेवर इतके मोठे होते की त्याची तुलना इतरांशी होऊ शकत नव्हते. एक निर्मिती करणारा होता, एक पालन करणारा होता तर एक मोक्ष देणारा होता. मात्र हा वाद इतका विकोपाला गेला की भगवान शंकराला प्रचंड राग आला आणि त्यांनी रुद्राक्षातून काळभैरवाची निर्मिती क...

गुरूनानक जयंती

Image
गुरुनानक जयंती  अलोक पवार कार्तिक पौर्णिमेला गुरूनानक जयंती साजरी केली जाते. गुरुनानक यांची शिकवण इतकी तेजोमयी, प्रकाशमयी होती म्हणून त्यांच्या जन्मदिवसाला प्रकाशपर्व असे देखील म्हणतात. शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक यांचा जन्म रावी नदीच्या किनारी तलवंडी या गावी १४६९ मध्ये झाला. हे गाव सध्याच्या पाकिस्थान मधील पंजाब भागात आहे. वडील काळूचंद खत्री तर आई तृप्ता देवी यांच्या पोटी नानक नावाच्या बालकाने जन्म घेतला.  लहानपणापासून नानक यांची तल्लख बुद्दी होती मात्र देवाच्या शोधविषयीच्या प्रश्नांची उत्तरे देताना गुरुनानक यांचे गुरू हतबल झाले आणि नानक यांची प्राथमिक पाठशाळा वयाच्या सातव्या आठव्या वर्षी सुटली. पुढील आयुष्य त्यांनी सत्संग, अध्यात्म यामध्ये व्यक्तीत केले. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांचा विवाह सुलक्षणी देवी यांच्या सोबत झाला. पुढे त्यांना श्रीचंद आणि लखमी दास असे दोन पुत्र देखील झाले. आपल्या संपूर्ण परिवाराला सासरवाडीत ठेवून त्यांनी अध्यात्मिक जीवन प्रचारासाठी यात्रा केल्या. त्यांनी भारत अफगाणिस्तान, फारस आणि अरबी भागांत यात्रा केल्या, याला पंजाबीमध्ये उदासिया असे म्हणतात....

छटपूजन : सुर्यपूजन

Image
  छटपूजन : सुर्यपूजन अलोक पवार आपल्या भारतातील एकदंरीतच सर्व सण हे आपल्याला निसर्गाला देव मानायला शिकवते. छटपूजन हा त्यापैकीच एक सण. प्रामुख्याने हा सण उत्तर भारतीय लोकांमध्ये आणि त्यातूनही बिहारी बांधवांमध्ये साजरा केला जातो.  सूर्याला शक्यतो मित्र म्हणले जाते. ऊर्जेचा प्रमुख स्त्रोत म्हणून सूर्याकडे बघितले जाते. सूर्याच्या प्रकाशामुळे पूर्ण अंतराळ प्रकाशमयी होते. समुद्राची भरती ओहोटी होणे हे देखील सूर्य आणि चंद्राच्या असण्याने होते. पाऊस पडण्याच्या प्रक्रियेत तर सूर्याचा प्रामुख्याने मोठा हस्तक्षेप आहे. हिरव्या झाडांमध्ये हरीतलवके बनण्याची प्रक्रिया ही देखील सुर्यामुळे होते. आणि एकंदरीतच आपले जेवण हे त्यावर अवलंबून असते असे म्हणावयास हरकत नाही. त्यामुळे सूर्य आपल्याबरोबर संपूर्ण जीव जंतूंचा देखील पालनकर्ता आहे हे म्हणावयास हरकत नाही.  इतिहासात किंवा पौराणिक कथांना अनुसरून देव आणि असुर यांच्या भांडणात जेंव्हा देव हरायला लागले तेंव्हा आदिती देवीने सुर्यपूत्र यम आणि त्याची बहीण षष्ठी देवीची पूजा करून सुर्यदेवासारखा तेजस्वी पुत्र प्राप्ती केला आणि त्याच्या मदतीने देवांनी पु...