कृष्ण जन्मोत्सव : आणि पडद्यामागच एक मोठे हत्याकांड
कृष्ण जन्मोत्सव : आणि पडद्यामागच एक मोठे हत्याकांड अलोक पवार प्रचंड पूर आला होता, आता पूर आला होता की आणला गेला होता म्हणजे ईश्वरी लीला वगैरे तो भाग विचार करण्या सारखा आहे. एखाद्या गोष्टी सोबत एखादी गोष्ट मोफत भेटली तर माणूस खूप खुश राहतो तसेच कदाचित एक आई- वडिलांसोबत अजून एक आई वडिलांचे प्रेम पाहिजे यासाठी हा सर्व थाट होता. कैद्यखान्याचे दरवाजे थेट उघडतात. आणि सुरू होते तात्पुरत्या सख्या आई वडिलांच्या सोबतची ताटातूट. आपले बालपण एका राक्षसी प्रवृत्ती पासून वाचविण्यासाठी ही एक शक्कल म्हणायला काही हरकत नव्हती. सहा मुल मारले गेले होते आत्तापर्यंत. बघा यामध्ये खूप गहन अर्थ दडलेला आहे. कंसाला आपल्या बहिणीविषयी देवकीविषयी विशेष प्रेम होते. पण तिच्या लग्नाच्या रथात तिला बसवताना आकाशवाणी होते की त्याच बहिणीचा आठवा पुत्र तुझा काळ बनणार आहे तेंव्हा ते भगिनीप्रेम क्षणार्धात संपते. आणि सुरु होतात मुलांना मारण्याची कार्यक्रमाची सुरवात. कंस बहिणीला तेंव्हाच मारणार असतो पण वासुदेव स्पष्ट म्हणतात मी हिचे सर्व पुत्र तुला आणून देईल. जेंव्हा पहिला मुलगा झाल्यावर वासुदेव त्याला घेऊन कंसाकडे येतो तेंव्हा त...