Posts

Showing posts from May, 2021

गोष्ट नरसिंह जयंतीची गोष्ट एका अधर्म नाशाची

Image
  गोष्ट नरसिंह जयंतीची गोष्ट एका अधर्म नाशाची प्रा अलोक अर्जुन अलका पवार "बोल वत्सा, तुला काय वरदान हवे", आधीच्या काळी साधारण हे असे ब्रम्हवाक्य प्रसिद्ध होते. हिरण्यकश्यपूने ऊन, वारा, पाऊस सर्व त्रास झेलून शेवटी ब्रम्हदेवाला प्रसन्न केले होते. ब्रम्हदेव पण इतकी कडक तपश्चर्या बघून त्वरित हजर झाले होते. त्यावेळी फक्त तथास्तू हा एक शब्द बोलले म्हणजे झाले. मात्र त्यावेळी पुढे कोणत्याही प्रकारची तोंडी परीक्षा नव्हती की पुढे काय करणार वरदान मिळाल्यावर, पुढचे थोडे फ्युचर प्लॅन सांगा वैगरे थेट तथास्तू. आणि मग याच तथास्तू च्या जोरावर पुढे जे काही होईल त्याला परत एक मोठा हंगामा अशी परिस्थिती. त्या काळी अगदी वरदान देताना लाभार्थी चे बॅकग्राऊंड तपासणे, कोणी रेफरन्स देत आहे का वरदान दिले की लाभार्थी कोणत्याही प्रकारे चुकीची कामे करणार नाही हे देखील काही नव्हते. या सर्व अद्ययावत मोहीमा फक्त कलयुगातच. सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग सर्व युगात ही सर्व अंधाधुंदी म्हणायला काही हरकत नाही.  बर कोणते वरदान होते याची यादी बघा. कोणत्याही मानवाच्या किंवा प्राण्यांच्या हाती मारला जाणार नाही. रात्र आणि...

आपल्यातला बुद्ध...

Image
  आपल्यातला बुद्ध प्रा. अलोक अर्जुन अलका पवार  सर्वत्र आनंद झाला होता, राणी महामाया ने एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. तो दिवस होता वैशाख पौर्णिमेचा. नेपाळ मधील लुंंबिनी शाक्य गणराज्याचा राजा शुद्धोधन आपल्याला मुलगा झाला, आपल्या राज्याला राजकुमार मिळाला म्हणून प्रचंड खुश झाला होता. मात्र राजपुत्राच्या जन्मानंतर अवघ्या सात दिवसांत त्याची आई म्हणजेच राणी महामाया यांचे निधन झाले. एका बाजूला राज्याला राजकुमार मिळाल्याचा आनंद होता तर दुसऱ्या बाजूला राणी यांचे निधन झाल्याने राज्य शोक व्यक्त करीत होते. राजकुमाराला सांभाळण्याची जवाबदारी राणीची सख्खी बहीण गौतमी हिने घेतली, व तिने पुढे राजा शुद्धोधन  याच्याशी विवाहदेखील केला. त्या तेजस्वी बाळाला बघायला आलेल्या ऋषीमुनींनी राजाला सांगितले की जर हे बाळ पुढे भविष्यात राजा झाला तर हा चक्रवर्ती राजा बनेल आणि जर याच बालकाने सन्यास घेतला तर त्याला जगाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त होऊन तो पुढे बुद्ध म्हणून प्रसिद्ध होईल. राजकुमाराचे नाव सिद्धार्थ ठेवण्यात आले होते. राजा शुद्धोधन आपल्या मुलाला सर्व आनंद उपभोगता येईल त्याला शाही थाटात राहता य...

सीता : का ती नकोशी झाली....

Image
 सीता : का ती नकोशी झाली.... प्रा. अलोक पवार  महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील घटना. साधारण २६५ मुलींना एका कार्यक्रमात बोलावले होते. बर या सर्व मुलींची नाव एकच होती. आणि त्या सर्वांसाठीचा हा कार्यक्रम. बर कार्यक्रमात त्या सर्व जणींना नवीन नाव प्राप्त होणार होते. या सर्व जणींचे नाव काय होते माहिती ..... नकोशी . अगदी पुण्यातील एक घटना ...२०१२ मधील मात्रेपुलाजवळ नदीपात्रालगत एक मुलगी भेटली. म्हणजे या दोन्ही घटना महाराष्ट्रातल्या. त्याच महाराष्ट्रातल्या जिथून सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना आधुनिक शिक्षण देण्याची सुरवात केली. आधी काही राजस्थान मधील घटना ऐकल्या होत्या, की मुलगी नकोय म्हणून जन्मल्यावर लगेचच तिला दुधाने भरलेल्या मोठ्या पात्रात सोडायची. खरच या मुली नकोश्या झाल्या आहेत का? कुठे आहोत आपण अजूनही रामायणात अडकलो आहोत का? अजूनही त्याच युगात आहोत का हा विचार करायला पाहिजे.  सीता आजही नकोशीच आहे ना? सीता तिच्या जन्माविषयी नाही माहिती पण ती राजा जनक याला वैशाख महिन्याच्या नवमीला धरणीमातेच्या पोटात भेटली, तोच तिचा जन्म म्हणावा. हीच असते ना सीता नवमी.  भारतामध्ये ...

पोहे, मित्र आणि बरंच काही

Image
 पोहे, मित्र आणि बरंच काही प्रा. अलोक पवार घरात जरा खूपच तणतण होती. मुलं पण काही दिवसांपासून उपाशी राहिली होती. पूजा अर्चना करून कोठून येणार पैसे घरी. सुदामा अगदीच परिस्थितीशी झुंज देत होता. बायको आणि पोरांची अगदी अन्नावाचून हालत झाली होती. घर, घर कसले चंद्रमोळी झोपडी होती. पण परिस्थिती बदलायची होती. काहीतरी तजवीज तर केली पाहिजे. मात्र आपला मित्र आहे तो मित्र मला नक्कीच या गरिबीच्या झोतातून बाहेर काढेल अशी अपेक्षा मनाशी घेऊन सुदामाने द्वारकेच्या दिशेने जाण्याचा निर्णय घेतला. मित्राकडून मदत मागणे थोडी लज्जास्पद वाटेल, त्याला भेटायला जातोय तर रिकाम्या हाताने जाणे योग्य ठरेल का म्हणून सुदामाने बायकोला काहीतरी घरातील जिन्नस पदार्थ शिल्लक आहे का बघायला लावला. बायकोने घरातले थोडे उरलेले पोहे दही साखरेत घातले आणि त्याची पुरचुंडी बांधून आपल्या नवऱ्याकडे सुपूर्त केली. सुदामा द्वारकेच्या दिशेने मित्राला काहीतरी खाऊ म्हणून ती पोह्याची पुरचुंडी घेऊन निघाला. द्वारकेमध्ये पोहोचताना रस्त्यातच सुदामाला आपल्या मित्राच्या घराची चाहूल लागत होती. अगदी सोनेरी किरणे समोर प्रसन्न पणे जाणवत होती. सुदामा द...

रमजान ईद ... ईद मुबारक

Image
 रमजान ईद ... ईद मुबारक  प्रा. पवार अलोक अर्जुन अलका   रमजान ईद .... मुस्लीम बांधवांचा आनंद साजरा करायचा सण. रमजान ईद सुरु करण्याच्या साधारण एक महिना आधीच या सणाची चाहूल लागायला सुरवात होते. सर्वत्र एक प्रकारचे पावित्र्य असे दिसून येते. सर्व मुस्लीम बांधव रमजानच्या सणाच्या आधीच एक महिना उपवास धरतात. हा उपवास म्हणजेच रोजा साधारण २९ ते ३० दिवसांचा असतो. मुस्लीम धर्माच्या दिनदर्शिकेनुसार हा रोजा समाप्त होतो आणि शव्वाल च्या पहिल्या तारखेला म्हणजेच ईद च्या दिवशी चंद्र दर्शनानंतर ईद साजरी केली जाते. महिनाभर आपले काम अंगमेहनत सांभाळून काहीच न खाण्यापिण्याचा उपवास धरणे ही एक प्रकारची परीक्षाच असते. आणि या परीक्षेला सामोरे जाण्याची शक्ती देवाने दिली म्हणून त्याचे आभार प्रदर्शन या सणाच्या दिवशी केले जाते. रोजा धरण्यासाठी सूर्योदयापूर्वी खाल्ले जाते आणि मग दिवसभर कडक उपवास पाळला जातो.   रमजान आणि ईद हे दोन्ही शब्दांचे अर्थ पहिले तर एक उत्कृष्ठ अर्थ समोर येतो. रमजान म्हणजे भरभराट आणि ईद म्हणजे आनंद. म्हणजेच हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात भरभराट आणि आनंद देतो. ईद हा एकट्याने...