बलिप्रतिपदा - पाडवा
बलिप्रतिपदा - दिवाळी पाडवा बळीराजा - वामन - व्यूहरचना - दानशूरता... याच धर्तीवर आजचा सण साजरा करतो आहे. बळीराजा म्हणून एक प्रसिद्ध राजा, ज्याने आपली प्रजा नेहमी सुखी राहावी याचा विचार केला. बळीराजाच्या राज्यात प्रजा अत्यंत खुश होती कारण सर्वत्र शेतमळे फुलले होते. कृषी इतकी हिरवीगार होती की सर्व जण खाऊन अगदी आपल्या राजावर खुश होते. याच बळीराजाने आपले कार्यक्षेत्र देखील एक बाजूला वाढविण्याचे ठरवले होते. यासाठी त्याने जवळ जवळ १०० अश्वमेघ यज्ञ केले. बळीराजाचा पुढचा अश्वमेघ यज्ञ हा देवराज इंद्र याला शह देण्यासाठीचा होता. बळीराजा आणि इंद्र हे दोन राजांमधील युद्ध होते. इतिहास ऐकला वाचला तर इंद्र त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे संकट आले तर तो थोडासा कावरा बावरा होतो ब्रम्हा विष्णू महेश यांच्या धावा करतो. यावेळी तो विष्णूकडे धाव घेतो. जवळ जवळ १०० पेक्षाही जास्त अश्वमेघ यज्ञ करून इतके राज्य जिंकले यावर या बळीराजाची पुढची नजर जेंव्हा देवराजा इंद्राच्या नगरी वर गेली तेंव्हा विष्णूला थेट युद्ध तर शक्य नव्हते तेंव्हा त्याने बटू म्हणजेच वामन रूप धारण केले. आणि हा वामनरुपी विष्णू यज्ञस्थळी प...