बेंदूर... जिवा शिवाची माझी जोडी

 बेंदूर ... जिवा शिवाची माझी जोडी

महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही भागात साजरा होणारा आजचा सण. आपला भारत हा कृषिप्रधान देश. महाराष्ट्राच्या मातीत देखील सोने पिकते. आता हे सोन पिकविण्यासाठी शेतकरी बांधवांचा मित्र म्हणजेच बैल. अजूनही बऱ्याच भागात बैल आणि बैलगाडीचा वापर करून शेती करतात. शेतकऱ्याच्या जोडीने तितक्याच कदापि जास्त ताकदीने बैल शेतात राबतो. आपल्या धन्याच्या जोडीने धान्य पिकवतो. आता बऱ्याच ठिकाणी बैलांच्या जागी नांगरणी, किंवा अन्य कामांसाठी टॅक्टर वापरला जातो मात्र तरीही बैलांचा वापर कमी झाला नाही. 

याच बैलांच्या मदतीचे उपकार त्यांच्याप्रती दाखविलेली कृतज्ञता म्हणजेच हा बेंदूर सण. भारतातील इतर राज्यातही हा सण साजरा केला जातो मात्र तिथीनुसार दिवस वेगळा पाहायला भेटतो. आपल्याकडे याला महाराष्ट्र बेंदूर किंवा महाराष्ट्रीयन बेंदूर असे देखील म्हणतात. बेंदूर आणि पुढे श्रावण महिन्यात येणार बैलपोळा दोन्ही सण साजरा सारख्याच पद्धतीने साजरा केला जातो. बेंदूर आषाढ पौर्णिमेला साजरा केला जातो. 


शेतात बैल राबतो, तो कष्ट करतो, त्याच्याविषयीची आपुलकीची भावना निर्माण होऊन आजच्या दिवस त्याला कामाला सुट्टी दिली जाते. सकाळीच त्याला अंघोळ घातली जाते. त्याच्या आवडीचा पेंढा त्याला खाऊ घातला जातो. जे ग्रामस्थ शहराच्या ठिकाणी राहायला गेले आहेत, मात्र गावाच्या चालीरीती जपण्यासाठी ते सर्व जण शहरातही बेंदूर साजरा करतात. शहराच्या ठिकाणी मातीच्या रंगवलेल्या बैलजोड्या विकत भेटतात. त्यांची अगदी पूजा करून नैवैद्य दाखविण्याने शहरातील लोकांना देखील आपण गावाच्या चालीरीती टिकवून ठेवल्यासारख्या वाटतात. गावाला बैलाला अंघोळ घालून झाली की त्याला रंगवले जाते. त्याच्या अंगावर छाप पाडले जातात. पांढरा बैल अशा छापांनी अगदीच सुंदर दिसतो. इतर रंगांच्या बैलाला देखील सजवले जाते. त्यांच्या बाकदार शिंगांना रंग लावला जातो. गळ्यात घुंगरांची माळ चढवली जाते. हरबरा डाळ आणि गुळाचे कडबोळे बनवून ते शिंगावर देखील लावले जातात. पुरणपोळी देखील बैलांना खाऊ घातले जातात. 



बेंदूर सणाला बैलाची खांदे मळणी केली जाते. ही खांदेमळणी विशेष म्हणायला काही हरकत नाही. बैल त्याच्या अंगावर शेतीचा भारा नेहमीच उचलून पुढे जात असतो. तेंव्हा त्याच्या खांद्याला विशेष आराम भेटावा म्हणून त्याच्या खांद्यावर म्हणजे त्याच्या वशिंडा पासून मानेकडील भागाला गरम पाण्याने घुतले जाते. शेकले जाते. आजच्या दिवशी या बैलांकडून कोणतेही काम करून घेतले जात नाही.   

आपला भारत देश असाच निसर्गाशी समतुल्य गोष्टींकडे संवेदनशिलतेने पाहतो. वेळप्रसंगी त्यांची पूजा करतो. त्यांना आपले मानतो. 

सर्व शेतकरी बांधवांना त्यांच्या या जीवलगासाठी बेंदूर सणानिमित्त शुभेच्छा !!! 


Comments

Popular posts from this blog

वटपौर्णिमा : एक अनोखी कहाणी

नागपंचमी

काळभैरव जयंतीनिमित्त